Saturday 31 December 2011

सरत्या वर्षातले " डायरीचे शेवटचे पान "




आज ३१ डिसेंबर  २०११
म्हणता म्हणता हेही वर्ष सरून गेले
बघता बघता दिवसही ते संपून गेले
डायरीची पाने हि मग उलटून जराशी ,
क्षण  हे आठवणींच्या हिंदोळ्यात  विरून  गेले ||

क्षणच ते............
काही हसवत गेले , काही हसत गेले
काही कुणाच्या  सोबतीने , काही कुणा विना गेले

क्षणोक्षणींच्या आठवणी त्या .......
भूतकाळ तो मागे सरला ....
भविष्याचा वेध घेण्यास ,
वर्तमान तो सामोरी आहे
संकल्पाच्या गाठी  सोडत
 नववर्षाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत !

हि अखेरची घटका आणिक ,
 एक नवी दिशा ती
त्या क्षितीजावर बघ....
नवीन उमेदीने नव्या आव्हाना सह उजाडते आहे !
उद्या पुन्हा होईल मग एक नवा सूर्योदय !!!!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
*** WISH U ALL A HAPPY NEW YEAR***

जयेश फडणीस

Tuesday 25 October 2011

तमसोमाज्योतीर्गामय


दिवाळीचा  सण
दिव्याची रोषणाई नि रंगांची उधळण 
उत्साहाचा आनंदाचा तेजोमय क्षण ......

अशा या मंगल दिनी 
एक  दिवा लावावा   देवापुढे - सुख  आणि शांती साठी ....
एक  दिवा लावावा   उंबरठ्यावर - यश प्राप्तीसाठी  नि सदसतविवेकसाठी ....
एक  दिवा लावावा  तुळशीवृन्दावनी - समृद्धी नि वैभवासाठी ....
एक  दिवा लावावा रांगोळीभोवती - आनंद  आणि समाधानासाठी ....

मग
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्यांचासाठी जे आजही अंधारात आहेत .....
ज्यांचा कडे तूप नाही , तेल नाही,
 दिव्याला वात नाही, ज्यांना  कोणाची साथ नाही ......

 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या हौतात्म्य पत्कारनार्यांसाठी .....
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या वीर देश बांधवांसाठी (सैनिकांसाठी) .....
 एखादा  तरी   दिवा लावावा आजन्म समाज कार्य करणाऱ्या थोर सामाजासेवाकांसाठी .....

ज्यांना या दिव्याचं  खर रहस्य उलघडलाय  त्यांचासाठी.....
" जे स्वतः जाळून इतरांना प्रकाशमान करतात  त्यांचासाठी ".......
एक तरी दिवा लावावा.....
हीच ती काय  प्रार्थना -
" तमसोमाज्योतीर्गामय "
( मला अंधाराकडून  प्रकाशाकडे ने  )
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ......
......................................जयेश फडणीस 

Saturday 22 October 2011

लहान पण देगा देवा .....



आजही आठवतात ते 


गोड गोड जिव्हाळ्याचे लाडिक क्षण ...


रम्य ते गोजिरवाणे बालपण ....



आजही आठवतात ती 


आईच्या कुशीतली साखर झोप...

.
दिवस भर हुंदडायचं -खेळायचं -खायचं


रात्री येऊन निवांत झोपायचं छान ...



आता तशी झोप काही लागत नाही ..

.
ते दिवस जगायला हि जमत नाही ...



आजही आठवतो तो 


आईने भारावलेला मऊ मऊ दुध भात 


गोडीलाडी करत मग हळूहळू खायचं 


एकेका घसा साठी सैरावैरा पाळायच...


बाबांचा पाठीवर बसून मग घोडा घोडा खेळायचं ...


लहान खेळण्यान सोबत बसून अजून लहान व्हायचं...


पत्त्यांचे बंगले बांधून मजेत उधळून द्यायचं...

रस्त्याने चालतानाही मग बोट धरून चालायचं...


मुद्दाम कंटाळा करून हात वर करायचं 


ऐटीत कडेवर बसून गालातल्या गालात हसायचं..

.
हव्या त्या गोष्टी साठी हट्ट करायचं नि खोटा नाट रडायचं...


रडून रडून मग शांत पणे झोपायचं...


आता काही केल्या जमत नाही

...
झोपेसाठी सुद्धा रडावं लागत... रडत रडत झोपावं लागत...



आजही आठवतात ती 


लहानपाणीची भांडण - " पेल्यातली वादळ "...


कडी 'कट्टी' तर कडी 'बट्टी'...


रुसवे फुगवे ते नेहमीचेच...


नव्याने डाव मांडायचो...


आता तसा होत नाही ...


मागे काही उरत नाही...



आजीचा बरोबरीन देवासमोर चुपचाप बसायचो ....


देवाची स्तोत्र नि रामरक्षा म्हणायचो ...


" प्रसादाकडे " लक्ष ठेऊन मग डोळे मिटून बसायचो ...


'गृहपाठ ' करून अगदी मनसोक्त खेळायचो ...


चार भिंतीतलं जग जगायला खूप खूप आवडायचं...



रात्र झाली कि दिवस संपायचा ...


त्या दिवसाचा शेवट हि तिथच व्हायचं....


दुसरा दिवस एक नवीन सकाळ घेऊन यायचा..

.
घरातल्या खिडकीवर 'चिऊ' चिवचिवाट करत बसायची...


नवीन स्वप्ने पहायची इच्छा असायची....


आता मात्र दिवस काही केल्या संपत नाही ...


नवीन दिवस काही उजाडत नाही...


घरातल्या खिडकीवर 'चिऊ' हि बसत नाही....





आजही आठवतात ते

गोड गोड जिव्हाळ्याचे लाडिक क्षण ...


रम्य ते गोजिरवाणे बालपण ....

Monday 15 August 2011

LUCK!!!



He worked by day
And toiled by neight
He gave up play
And some delight
Dry books He read
New things to learn
And forged ahead
Success to earn
He plodded on with
Faith and pluck;
And when He WON…
Men called it…. LUCK!!!.......................​..............................​..............................​.
..............................​................Strange!!! But Fact!!!.......................​...

कट्ट्यावरच्या आठवणीतल्या चारओळी...



गणिताच्या तासाला बसणं


हि जरी सजा आहे


तरी नवीन मॅडमना पाहणं


यातही थोडी मजा आहे........

आम्हाला फिजिक्स शिकवणारी


एक सुंदर मिस आहे


सगळे म्हणतात कॉलेज मध्ये फक्त


तेवढाच चांगला पीस आहे.......

स्टाफ रूम मध्ये सरांची


मॅडम वर नजर आहे


दारा आडून बघायला सारे


कट्ट्या वरचे हजर आहेत ............

लेक्चर ला बसलोच चुकून


तर ' ती ' च्या कडेच नजर आहे


प्रश्न विचारला सरांनी तर


काय " हरी नामाचा " गजर आहे.......

पेपर मध्ये प्रश्न पडतो..


काय ' work 'चं unit ' ज्यूल ' आहे ??


माहित नाही कारण लेक्चर पेक्षा


कँटिन चा attendance ' फूल ' आहे........

इतरांच्या प्रेम प्रकरणात


सर्वांच लक्ष आहे


एकटा कोणी सापडला की कट्ट्या वरच्या


" आजच्या मेन्यू " तल ते ' भक्ष्य ' आहे.......

न्यूटन चे नियम नि प्रेमाचे त्रिकोण तर


आता रोजचे आहेत


कट्ट्या वरचे सर्व जण


" बेरजेत मिळालेले हातचे आहेत "........

कॉलेजात कोणी पटली नाही ...


कधी पटेल, कळत नाही.... पण


कट्ट्या वरचे ' मित्र ' मात्र ,


इतक्या सहज सहजी मिळत नाहीत.........

FRIENDS FOREVER.......................​..............................​......................

प्रेमात नेमकं असं कस घडतं?



ऐन ग्रीष्मातच झाडाला पालवी फुटलेली वाटते ..


काट्यांना च फुले आलेली दिसतात ..


सुकलेलं गवतहि हिरवगार दिसत....


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......





जागेपणीच स्वप्नं पडतात ..


येता जाता आरशात बघावसं वाटत ..


गाणी गुणगुणत हिंडावस वाटत ..


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......



गुलाबी रंगच मग आवडीचा वाटतो....


सतत तिचा विचार मनात दाटतो...


तिचा सादा आवाज ऐकायला जीव आटतो..


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......



एक साधा मिस्ड कॉलच कारणीभूत ठरतो...


का? आपल्याला वेगळ्याच रंगात भरतो...


त्या मिस्ड कॉलवर मग तडग फोन करतो..


अन नकळत त्या मिस च्याच प्रेमात पडतो..


नेमक प्रेमात असं कस घडतं???



कधी कधी तिचा कॉल रिसीव्ह होतो..


" तू का केलास मीच करतो ..." असं आपण म्हणतो..


मनात काहीतरी वेगळं असत ,ओठावर यायला कपात असत..


कोणाला ते कस सांगाव हेच मुळी कळत नसत...


नेमक प्रेमात असं कस घडतं???



कधी तिचा एस .एम .एस. येतो..


तोच मग दहा वेळा वाचत बसतो...


प्रत्येक शब्दा मध्ये तीच असल्याच वाटत..


पण तिलाही तो कोणी तरी फॉरवर्ड केल्याच ते आपण विसरतो...


मग नेमक प्रेमात असं कस घडतं???



सतत चेहेरा समोर असतो..


दिसता क्षणी ती ओझरती , ओठांवर मंद हसू उमटत....


प्रत्यक्ष भेटल्यावर तर भानच हरपत..


बोलायचं एवढं असत ,पण सगळंच विसरत...


मग नेमक प्रेमात असं कस घडतं???



मिस्ड कॉल ची गाथातर चालूच असते..


मग उगीचच आपल्यालाच भाव खावासा वाटतो...


आणि अचानक रिसीव्ह लिस्ट मधून तिचा नंबर गायब होतो..


मिस्ड कॉल हि बंद होतात...



आपण सतत फोन जवळच असतो..

केवळ मग त्या मिस्ड कॉलची वाट पाहत बसतो....


 का कोणास ठावूक पण ...........


प्रेमात नेमक असं कस घडतं?
..............................​.....................

बॉम्बस्फोट .............!!!!!!



धुम्म ऽऽऽऽऽऽऽऽ. धडाम्म्मऽऽऽऽऽऽऽऽऽ.............​...


प्रचंड हाहाकार

 ........
किर्काश्या किंचाळ्या 

....
सैरा वैरा पाळणारे जीव

 ...
हवेत उठलेला धुराचा लोट.....


कावरी बावरी मन.

.....
काय झालं??? झाल तरी काय अचानक???


उत्तर तेच.......................


बॉम्बस्फोट!!!

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....


अमुक ठार नि तमुक जखमी....


सकाळी पहिल्या चहा सोबत


वाचायला मिळणारी एक बातमी.....


बॉम्बस्फोट झाला

...........
दहशद वादी हल्ला झाला ......


आक्रमणे झाली.

....
काही नाही आता सगळ्याची सवय झाली.......!!!



पुन्हा बॉम्बस्फोट..


मेले मारणारे ........ चार -चौघे.... सर्वसामान्य....


झाल्या प्रकारा बद्दल खंत वाटली...


दिलगिरीही व्यक्त झाली....

.
अफवांवर विशास न ठेवता शांती बाळगण्याचे आवाहन झाले....


आशावासाने हि देऊन आता जुनी झाली...


तपास झाला... अटका झाल्या...


कोर्टात केस चालली...चालू आहे...चालू राहते ..

.
निर्णय मात्र.........................​.....


प्रश्न पडतो



..............
" तो " आहे तरी कुठे?? आहे का नक्की???


विसर पडलाय का त्यालाच स्वतःचा?..........


उत्तर येत.....................


' बुद्ध ' आहे!!


' बुद्ध ' होता!!


' बुद्ध ' असेलही.............. पण शांत....... निद्रिस्त...........!!!!!



तोवर नवी सकाळ होते आणि बातमी येते.................

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....!!!!!!
कधीतरी अनोळखी वाटेवरती चालावस वाटत ....

मनातल काही बोलावस वाटत...


चालता बोलता सुचत बरंच असत ....


पण वाटे वरती कोणीच नसत....

अशाच एका "अनोळखी " वाटे वरल्या चार ओळी....



वाट ही जीवनाची....


वाट ही मरणाची...


या वाटेवर चालणाऱ्या


प्रत्येकाच्या वाट्याची...!!



वाट ही सुखाची...


वाट ही दुःखाची....


उन पावसात न्हाणाऱ्या


वाटेवरल्या दगडाची...



वाट ही उष्मेची....


वाट ही छायेची..


पानापाचोल्यातील


प्रत्येकी फुलाची...



वाट ही अशीच - अखंड.....


क्षितिजा पलीकडे गेलेली...


वाट ही अशीच - अनामिक.....


प्रत्येकाच्या आयुष्यात दडलेली....!!!



या वाटेशीच जडले .....


जीवनाचे गूढ नाते....


सरते शेवटी 'वाट ' ही......


वाटेवरती विरुनी जाते.............!!!!!!!!


आयुष्यात काही क्षण असेही येतात ..............

ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही


अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी



कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात


तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात


कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात


तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात

आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत


अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत



कधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत


तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख



कधी सोबत असूनही प्रेम आटते


तर कधी विरहहि संगमाप्रमाणे....


INDIAN INDEPENDENCE DAY!!!

माँ...

माँ एक इमान है ,माँ एक पहचान है |


हर एक की सासों मै बसती है ...


दिल से देखो तो माँ एक भगवान है |


उसी " भारत " माँ के चरनोमे प्रणाम करते हुए ...

ए वतन ... ए वतन...


मिटेंगे हम तुजे मिटने न देंगे ,


लिखेंगे खून से इतिहास लेकिन ,


" तिरंगे" को कभी झुकाने न देंगे |

अगर मरना ही है हमको तो मरेंगे शान से 
,



ए वतन तेरे लिए मर मिटेंगे जी जान से |

कभी आने न पाए हौसले मै इस लिए अकसर,


हम अपनी कश्तीयों के पास खुद तूफान रखते है ,


तुम ही बताओ हम दोनों मै सच्चा प्यार किसका है ,


तुम तो होटों पे ... हम सिने मै " हिंदुस्तान " रखते है |

वो दिल ही क्या जो मिलने की दुआ न करे ,


तुजे भूलकर जीउँ ... खुदा न करे,


रहेगा तेरा प्यार सदा मेरी जिंदगी बनकर...


मेरी हर एक साँस , धड़कन ही तुजपे कुर्बान करे |



PROUD TO BE AN INDIAN!!!

" WISH U A HAPPY INDEPENDENCE DAY "